पराभवामुळे माझे मनं भरून आले आहे आणि तुमचे देखील आले असेल, रोहित गहिवरला

0
535

मुंबई, दि, १२ (पीसीबी) – न्युझीलंड सोबत भारताला उपांत्य फेरित पराभवाचा सामान कराव लागल्याने विश्वचषकातील भारताच प्रवास थांबला लागला आहे. या सामन्यात आघाडीच्या फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे संघाला पराभवाच्या खाईत जावे लागले. या पराभवानंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून खंत व्यक्त केली आहे.

रोहित शर्मा म्हणाला की, न्युझीलंड विरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना पहिली ३० मिनिटांच्या सुमार खेळीमुळे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. या पराभवामुळे माझे मन भरून आले आहे. आणि तुमचे देखील आले असेल. या संपूर्ण विश्वचषकात समर्थकांनी खूप साथ दिली आणि इंग्लंडच्या भूमीला निळा रंग आणला त्यासाठी मी आभारी आहे.