Maharashtra

आघाडीच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? – अजित पवार

By PCB Author

August 19, 2019

पैठण, दि. १९ (पीसीबी) – पश्चिम महाराष्ट्रातील पूर ओसरल्या नंतर थांबलेली शिवस्वराज्य यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात झाली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची दुटप्पी भूमिका असल्याचे म्हणत, आमच्या काळात आंदोलन करणारे अण्णा हजारे आता गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे समाजिक, देशहिताच्या बाजूने आंदोलनातून लढा देतात. भ्रष्टाचाराच्या विरूद्ध अण्णा हजारेंनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, आता विद्द्यमान सरकार देशातील कायद्यावर घाला घालत असताना अण्णा मात्र शांत बसले आहेत असा प्रश्न पवार यांनी केला आहे.