आगामी लोकसभेसाठी औरंगाबाद-जालन्यात भाजप-शिवसेनेला राष्ट्रवादीचे आव्हान!

0
482

औरंगाबाद, दि. १६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद व जालना या दोन मतदार संघात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी वाटाघाटी सुरू असल्याचे समजते. अर्घ्या जागा राष्ट्रवादीला आणि अर्घ्या काँग्रेसला देण्याचा फॉर्म्युला असावा, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. पण कॉंग्रेस त्यावर अनुकूल नसल्याचे दिसते. मात्र, यामुळे भाजप आणि शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे.