आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये मराठा-ओबीसी संघर्ष उद्‌भवेल – अॅड. प्रकाश आंबेडकर

0
678

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी मतदार यांच्यात मोठा संघर्ष उद्‌भवेल, असा अंदाज भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मराठा जातीला एसईबीसी प्रवर्गातून शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिल्याने ओबीसीतील सर्व जाती भयभीत झाल्या आहेत. आपले सर्वस्व गेल्याची भावना ओबीसींमध्ये आहे. हा असंतोष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसेल. मराठा समाजाची आरक्षणासंबंधी भावना तीव्र होती. त्याचा लाभ उठवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच यशस्वी झाले आहेत.

मराठा जातीला आरक्षण दिल्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत १८० जागा मिळतील, असे मुख्यमंत्र्यांना वाटत आहे. प्रत्यक्षात तसे अजिबात होण्याची शक्यता नाही. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात हे स्पष्ट होईल. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी चुकीची आहे. ऊठसूठ नामांतराची मागणी करणे गैर आहे. ऊठसूट नामांतराची मागणी करणे गैर आहे. मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनचा एक इतिहास आहे. नामांतराने हा इतिहास पुसून टाकला जाईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.”