नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या हर हर मोदीचा सामना काँग्रेस ‘बोल बम’ या घोषवाक्याने करणार आहे. २०१४च्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अच्छे दिन आनेवाले है, घर घर मोदी, अब की बार मोदी सरकार, हर हर मोदी या घोषणांनी जनतेला भुरळ घातली होती. आता या धर्तीवर भगवान शंकराशीच जवळीक दाखवणारा ‘बोल बम’ ही घोषणा काँग्रेसने निवडणूक प्रचारात वापरण्याचा निर्णय घेतला आहे.