आकुर्डीत तरुणावर चाकुने वार करुन १५ हजारांचा मोबाईल लंपास

0
489

आकुर्डी, दि. १८ (पीसीबी) – पायी चाललेल्या एका तरुणाला अडवून चौघा जणांच्या टोळक्यांनी चाकुने सपासप वार केले. तसेच त्याचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्ती हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि.१७) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास आकुर्डीतील सेंट उर्सेुला शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कोपऱ्यावर घडली.

समाधान भास्कर वाघ (वय २९, रा. व्यंकटेश्वर निवास, श्रीकृष्णनगर, विठ्ठलवाडी, आकुर्डी) असे चाकुचे वार होऊन जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास समाधान हा पायी आकुर्डीतील सेंट उर्सेुला शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कोपऱ्यावरुन चालला होता. यावेळी अज्ञात चौघा चोरट्यांनी त्याला अडवले तसेच त्याच्या डोक्यात आणि हातावर चाकुने वार करुन विवो वि ५ हा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. निगडी पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.