अाता जनतेलाच विचारणार; माझं नेमकं काय चुकलं? अगतिक खडसेंची खंत

0
492

मुक्ताईनगर, दि. ३ (पीसीबी) –  ‘गेली ४० वर्षे भाजपची सेवा करीत आहे. असे काय झाले की एका दिवसात बदनाम करण्यात आले? अाता राज्याचा दौरा करून माझे काय चुकले? हे आता जनतेलाच विचारणार आहे’, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी व्यक्त केली. खडसेंच्या गावी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात हा संकल्प बोलून दाखवला.