“अहो फडणवीस, हिंमतीची भाषा करायला जिगर लागते”

0
288

मुंबई,दि.१७(पीसीबी) – अहो फडणवीस, हिंमतीची भाषा करायला जिगर लागतं. हिम्मत कुणाची काढताय?? परत निवडणुका लागल्या तर पडता भुई थोडी होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटीकरी यांनी फडणवीसांना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवा, असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. यावरून अमोल मिटकरी यांनी फडणवीसांचा जोरदार समाचार घेतला आहे.

नशीब १०५ वर अडकून आहात परत खेटलात तर १५ पण निवडुन येणार नाहीत, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.