अहमदनगर-सोलापूर महामार्गावर स्कॉर्पिओला कंटेनरची धडक ; ५ वारकरी ठार

0
577

सोलापूर, दि. २२ (पीसीबी) – अहमदनगर-सोलापूर महामार्गावरील पाटेवाडी गावाजवळ  स्कॉर्पिओ जीपला एका कंटेनरने जोराची धडक दिली. या अपघातात  ५ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.  तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास झाला.  

अपघातातील सर्व मृत हे खरवंडी (ता. नेवासा, जि. नगर) येथील आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारीनिमित्‍त अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेले होते. ते पंढरपूर येथून परत येत असताना नगर-सोलापूर रस्त्यावर पाटेवाडी गावाजवळ त्‍याच्या स्कॉर्पिओ जीपला एका कंटेनरने जोरधार धडक दिली.

या अपघातात जीपचा चक्काचूर झाला आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. मृतांमध्ये जामखेड तालुक्यातील दोन शिक्षकांसह तिघांचा समावेश आहे. घोडेगाव येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक बाळासाहेब लक्ष्मण माळवदे (वय ५०) व रमेश भाऊसाहेब कातोरे (वय ७०) या शिक्षकांसह स्कार्पिओ चालक हानू अंबादास दुसे आणि नेवासा फाटा येथील दगडू आनंदा भणगे (वय ५०), द्रौपदी भाऊसाहेब कातोरे (वय ७०) दोघा जणांचा यात समावेश आहे. तर सत्यम रमेश कातोरे (वय १६) हा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे.