मुंबई, दि. १ (पीसीबी) – अहमदनगर महापालिकेमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी यांची आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू होते, असा गौप्यस्फोट राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज (मंगळवार) केला आहे. या आघाडीसाठी मी स्वतः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली होती, असे कदम यांनी यावेळी सांगितले.