असत्य, हिंसा, अशांती हेच सत्ताधारी भाजपा सरकारची तत्वे – संजोग वाघेरे-पाटील

0
757

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – सत्य, अहिंसा, शांती हे महात्मा गांधीचे तत्व होते. असत्य, हिंसा, अशांती हेच भाजपा सरकारची देखील तत्व आहेत, अशा शब्दात शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील  यांनी भाजपावर टिका केली.  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १४९ व्या जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) खराळवाडीतील पक्ष कार्यालयसमोर “मौन आंदोलन’’ करण्यात आले. 

यावेळी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता(काका) साने, योगेश बहल, विठ्ठल काटे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, भाऊसाहेब भोईर, फजल शेख, नगरसेवक, मयुर कलाटे, पंकज भालेकर, सुलक्षणा शिलवंत (धर), संगिता ताम्हाणे, महंम्मद पानसरे, अतुल शितोळे, पंडीत गवळी, शमीम पठाण, विजय लोखंडे, अतुल शिताळे, आनंदा यादव, विशाल वाकडकर, वर्षा जगताप, विशाल काळभोर, निलेश पांढारकर, पुष्पा शेळके, कविता खराडे, राजेंद्र साळुंके, विश्रांती पाडळे, उत्तम हिरवे, ज्ञानेश्वर कांबळे, पंडीत गवळी, अंकुश पठारे, मनिषा गटकळ, शिला भोंडवे, उत्तम आल्हाट, बाळासाहेब पिल्लेवार, मिनाक्षी उंबरकर, लाल महंम्मद चौधरी, शक्रुल्ला पठाण, छाया साबळे, हमीद शेख, जहिर खान, दत्तात्रय जगताप, पवन जवळकर, गंगाधर घाटगे, मयुर जाधव, संगीता काकणे, विक्रम पवार, मनोहर भोसले, अभिजीत आल्हाट, सविता धुमाळ, सुमित लगस, परमेश्वर गोफणे, अंकुश पठारे, छाया साबळे, विनोद सस्ते, रामदास मोरे, सुनिल अडागळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व शहरात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात मौन धारण करून आंदोलन करण्यात आले. सर्व सामान्य जनतेमध्ये वाढलेला प्रचंड असंतोष, झालेला भ्रमनिरास, केवळ अच्छे दिनाच्या नावाखाली केलेली जनतेची फसवणूक आदि गोष्टीमुळे जनता त्रस्त झालेली आहे. शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव न मिळणे, महिला अत्याचारामधील वाढ, खुन बलात्कार, चूकीचे कामगार धोरण, प्रचंड होत असलेला भ्रष्टाचार आदि विषयांवर मौन धारण करून आंदोलन करण्यात आले. सत्य, अहिंसा, शांती हे महात्मा गांधीचे तत्व होते. असत्य, हिंसा, अशांती हे भाजपा सरकारचे तत्व आहे, असे म्हणत सत्ताधारी पक्षाने “जवाब दो” अशा घोषणा देण्यात आल्या.