Maharashtra

अशा वेगाने ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ४०० महिने लागतील – देवेंद्र फडणवीस

By PCB Author

February 25, 2020

मुंबई,दि.२५(पीसीबी) – राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. एक नवा पैसा शेतकऱ्याला दिला नाही. गाजावाजा करत कर्जमाफी दिली. अशा वेगाने ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ४०० महिने लागतील, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

महिन्याला केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला, अशा वेगाने ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ४०० महिने लागतील, असं गणित सांगत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

ज्या गावात शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या, त्या गावातील ३५ टक्केही शेतकरी कर्जमाफीत येत नाहीत. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक होत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.