अर्थहीन कारण देत विकी कौशलचा सरदार ‘उधम सिंग’ चित्रपट ऑस्करच्या यादीतून वगळला; चाहते संतापले

0
325

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या ज्युरींनी सरदार ‘उधम सिंग’ या चित्रपटात ब्रिटिशांबद्दल द्वेष दाखवण्यात आला आहे, असं म्हणत विकी कौशलचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट ऑस्करच्या यादीत घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे. ही बातमी आल्यापासून चाहते तर चांगलेच संतापले आहेत. हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी Amazon Prime वर प्रदर्शित झाला. यात शॉन स्कॉट, बनिता संधू, कर्स्टी एव्हर्टन आणि स्टीफन होगन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील विकी कौशलचा अभिनयही चांगलाच गाजला आहे. पण आता ज्युरींनी हा चित्रपट ऑस्कर २०२२ च्या नामांकनातून वगळला आहे. ब्रिटिशांबद्दलचा द्वेष दाखवण्यात आल्याचे कारण ज्युरींनी सांगितले आहे. शूजित सरकारच्या या चित्रपटाची निर्मिती रॉनी लाहिरी आणि शील कुमार यांनी केली आहे. ज्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. ऑस्कर पुरस्कारांसाठी अधिकृत प्रवेश निवडलेल्या समितीचे सदस्य इंद्रदीप दासगुप्ता यांनी सरदार उधम यांना नाकारण्याचे कारण सांगितले आणि ते म्हणाले, सरदार उधम हा चित्रपट आणि जालियनवाला बाग घटनेवर आधारित आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका अनसन्ग नायकावर एक भव्य चित्रपट बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, पण या प्रक्रियेत आपला इंग्रजांबद्दलचा द्वेष समोर येतो. जागतिकीकरणाच्या या युगात एवढा द्वेष बाळगणे ही चांगली गोष्ट नाही. मात्र, इंद्रदीपने हा चित्रपट आंतरराष्ट्रीय दर्जाचा म्हणायला हरकत नसल्याचे म्हटले.

आणखी एक ज्युरी सदस्य सुमित बसू म्हणाले, “सरदार उधम यांचे उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि कॅमेरा वर्क, एडिटिंग, ध्वनी डिझाइन आणि त्या काळातील पुनर्बांधणी यासाठी अनेकांना आवडले आहे. मात्र, चित्रपटाची लांबी हा मुद्दा बनला. त्याचा क्लायमॅक्सही काढण्यात आला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडातील शहीदांच्या वेदना प्रेक्षकांना जाणवायला बराच वेळ लागतो.”

सरदार उधम यांना ऑस्करसाठी न पाठवण्याचे कारण समोर येताच सोशल मीडियातून त्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. अनेक युजर्सनी ट्विट करून आपला निषेध नोंदवला आहे. कमिटीच्या या निर्णयावर चित्रपटाच्या चाहत्यांनी कमेंट्सद्वारे जोरदार टीका केली आहे. निर्मितीमूल्ये कमी पडली म्हणून तो नाकारला गेला असता तर एक वेळ समजून घेता आलं असतं. भारतीय ज्युरींनी दिलेलं कारण अत्यंत संतापजनक असल्याचे प्रेक्षकांनी म्हटले आहे.