मुंबई, दि. १७ (पीसीबी) – महाराष्ट्राचे महसूल उत्पन्न गेल्या चार वर्षांच्या काळामध्ये घटले आहे, असे १५ व्या वित्त आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. उद्योग, व्यवसाय आणि धंदे डबघाईला आल्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात अर्थमंत्र्यांवर हक्कभंग दाखल करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.