Maharashtra

अरे बंगल्यांवर उधळपट्टी कशाला करताय, बंगले पूर्ण होण्याआधीच तुम्ही जाणार आहात – चंद्रकांत पाटील

By PCB Author

February 12, 2020

पुणे,दि.१२(पीसीबी) – अरे तुम्ही किती दिवस राहणार आहात, तुमचे बंगले पूर्ण होण्याआधीच तुम्ही जाणार आहात. पण त्यासाठी तुम्ही किती खर्च कराल. टेंडरपण अजून काढलं नाही. उधळपट्टी चालू आहे. तसेच कमीतकमी वेळात जास्तीत जास्त ताटात ओढण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

मंत्र्यांच्या बंगल्यावर ठाकरे सरकारकडून कोटींची उधळपट्टी करण्यात येत आहे. मंत्र्यांच्या ३१ बंगल्यांच्या डागडुजी, नुतनीकरणासाठी तब्बल १५ कोटींची तरतुद करण्यात आली आहे.

आपण लोकांचे सेवक आहोत त्यामुळे आपण कमीत कमी सुविधा घ्यायला हवी. मी पाच वर्षात माझ्या बंगल्याचा रंगही बदलला नाही. मात्र, आज तुम्ही आज बंगल्याचं सर्व चित्र बदलत आहात. या सरकारची नुसती उधळपट्टी सुरु आहे, असं ते म्हणाले आहेत.