अयोध्येला जाताना उध्दव ठाकरे शिवनेरीवरील मातीचा कलश नेणार

0
597

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा २५ नोव्हेंबरला अयोध्यामध्ये मेळावा होणार आहे. त्याची शिवसेनेकडून  जय्यत तयारी सुरू आहे.  अयोध्येला रवाना  होण्यापूर्वी उद्धव ठाकरे शिवनेरी गडावर जाऊन तेथील माती कलशात भरुन अयोध्येला  घेऊन जाणार आहेत.

शिवसेनेचे  अनेक नेते अयोध्येत दाखल झाले असून मेळाव्याच्या ठिकाणी शिवसेना नेत्यांनी पूजा केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे आणि विनायक राऊत  आदी नेते यावेळी उपस्थित होते. वारकऱ्यांच्या एक गटानेही उद्धव ठाकरेंच्या  या दौऱ्याला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या अयोध्या दौऱ्याचे  अखिल भारतीय आखाडा परिषदेने आमंत्रण  धुडकावून लावले आहे. तसेच उद्धव ठाकरे  राजकीय खेळी करत आहेत, असा गंभीर आरोपही आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी केला आहे. त्याचबरोबर आखाड्याशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्याच नाही तर २५ नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत, असेही नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले आहे.