अयोध्या वादात उशीर हा हिंदूंचा अपमान – संघ

0
438

मुंबई, दि.२ (पीसीबी) – “अयोध्या वादाची सुनावणी पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकल्याने हिंदूंचा अपमान झाला आहे. या प्रकरणात लवकरच निर्णय होईल,असा विश्वास आम्हाला होता. परंतू सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय लांबवल्याने आम्ही प्रतीक्षा वाढवली आहे,” असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे. संघाचे कार्यवाहक भय्याजी जोशी यांनी आज(२ नोव्हेंबर) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला.

“तसेच राम मंदिराच्या निर्माणासाठी अध्यादेश आणण्याच्या मागणीचा पुनरुच्चारही आरएसएने केला आहे. गरज पडल्यास राम मंदिरासाठी संघ १९९२ सारखे आंदोलनही करेल. आमची प्रथमिकता वेगळी आहे. असे सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याने हिंदू समाजात अपमानाची भावना आहे,” असे भय्याजी जोशी म्हणाले.