‘अब की बार उस पार’; गिरीराज सिंहांचे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्याचे विधान  

0
312

नवी दि्ल्ली, दि. २१ (पीसीबी) – जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर आता ‘अब की बार उस पार’, असे म्हणत केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये  घुसण्याचे विधान एका ट्विटमध्ये केले आहे.   

यावर गिरीराज सिंग यांच्यावर विरोधी पक्षांनी  टीका केली आहे.  तुम्हाला सीमेपलिकडे जाण्यासाठी कोणी थांबवले आहे? असा सवाल काँग्रेस आणि राजदने केला आहे.  केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी गिरीराज सिंग अशी वक्तव्य करत आहेत. त्यांच्याकडे हिंमत असेल तर त्यांना आणि केंद्र सरकाला कोणी थांबवले आहे, असा सवाल काँग्रेस नेते प्रेमचंद मिश्रा यांनी केला आहे.

गिरीराज सिंग हे केवळ पाकव्याप्त काश्मीरबद्दल का बोलतात आणि चीन बद्दल शांत का राहतात, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. तसेच कायम प्रकाशझोतात राहण्यासाठी ते असे करत असतात, असे राजदचे नेते विजय प्रकाश यादव म्हणाले.