अबब…भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ५०० कोटींचा सट्टा

0
664

दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – भारत आणि पाकिस्तानमधील आज (बुधवार) होणाऱ्या क्रिकेट सामन्यावर आतापर्यंत ५०० कोटी रुपयांचा सट्टा लागला असल्याची माहिती समोर येत आहे. भारत-पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेट रसिकांना या सामन्याची उत्सुकता आहे. सट्टाबाजारात भारतीय संघाचा भाव ७० पैसे असून, भारत जिंकल्यास सट्टा लावणाऱ्याला १.७० रुपये मिळतील अशी चर्चा आहे.

सट्टाबाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक म्हणजेच ५०० कोटी रुपयांचा सट्टा लावण्यात आला आहे. विजयाची शक्यता असलेल्या संघापासून ते नाणेफेक, शतक, अर्धशतक, चौकार, षटकार, विकेटपर्यंत प्रत्येक गोष्टीवर सट्टा लावल्याची माहिती मिळते आहे. आशिया कपसाठी निवडलेल्या भारतीय संघात विराट कोहली नसला, तरीही सट्टेबाजांसाठी भारतीय संघच पसंतीचा संघ असल्याचे दिसून येते आहे. भारतीय संघ जिंकण्याचीच शक्यता ८० टक्के सट्टेबाजांनी वर्तवली आहे. त्यामुळे भारतीय संघावरच सर्वाधिक पैसा सट्टेबाजांनी लावला आहे.