अपघातवार! हुबळीत मुंबईचे सहा ठार; शहापुरात चौघांना चिरडले

0
655

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – आग्रा महामार्गावर शहापूरजवळ आज एका भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला वाहनांची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना उडवले. यात चौघे जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले. तर कर्नाटकातील हुबळी येथेही ट्रक आणि बसच्या धडकेत सहा जण ठार झाले. तर दहा जण जखमी झाले. मृत प्रवासी मुंबईतील आहेत.

शहापूरजवळ काही प्रवासी वाहनांची वाट पाहत उभे होते. त्याचवेळी भरधाव कारने या प्रवाशांना चिरडले. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्थानिकही मदतीसाठी धावले. त्यांनी मदतकार्याला सुरुवात करून जखमींना तातडीने रुग्णालयात नेले.

कर्नाटकातील हुबळी येथे राष्ट्रीय महामार्ग ६३ वर बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यात सहा जण ठार झाले. हे सर्व जण मुंबईतील आहेत. ते खासगी बसने कर्नाटकला जात होते. तर या अपघातात १० जण जखमी झाले. त्यांना कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (केआयएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.