मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील महिला आपला भाऊ मानतात. दरवर्षी त्यांना राखी बांधली जाते. मात्र, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांना या नात्याचा आणि पदाचाही विसर पडला आहे. बेपत्ता मुली- महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करावे. अन्यथा, आगामी निवडणुकीत राज्यातील महिला मुख्यमंत्र्यांनाच ‘वर्षावरून ‘बेपत्ता’करतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.