Notifications

अनिल अंबानींना देश सोडून जाऊ देऊ नका; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

By PCB Author

October 03, 2018

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – स्वीडनची टेलिकॉम कंपनी इरिक्सन आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्या आरकॉम कंपनी दरम्यान सुरू असलेली कायदेशीर लढाई थांबताना दिसत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही अंबानी यांच्या कंपनीने ५५० कोटींची भरपाई दिलेली नाही. त्यामुळे अंबानीसह रिलायन्सच्या दोन बड्या अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्यास मज्जाव करावा, अशी मागणी करणारी याचिका इरिक्सनने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.