अतिरेक्यांविरोधात आणखी एक सर्जिकल स्ट्राइक हवा – बीपिन रावत

0
375

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी धुडगूस घातल्याने त्यांच्याविरोधात सर्जिकल स्ट्राइक करावा लागेल, असा इशारा लष्कर प्रमुख बीपिन रावत यांनी दिला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी तीन पोलिसांना ठार केल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख बीपिन रावत यांनी हा इशारा दिला. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. ‘जोपर्यंत पाकिस्तानी सेना आणि आएसआयवर पाकिस्तानी सरकारचं वर्चस्व निर्माण होत नाही, तोपर्यंत सीमेवरचा तणाव कमी होणार नाही’, असेही रावत यांनी सांगितले.

नैराश्यातूनच अतिरेकी पोलिसांना टार्गेट करत असल्याचंही ते म्हणाले. ‘काश्मीर खोऱ्यात भारतीय सैनिकांचं ऑपरेशन सुरुच राहील. काश्मिरात सामान्य जनतेचे हाल होत आहेत. तर फुटीरतावाद्यांचे नातेवाईक परदेशात आनंदात राहत आहेत’, अशी टीका त्यांनी केली. काश्मीरमधील तरुण रोजगाराच्या शोधात आहेत आणि तिकडे फुटीरतावादी व दहशतवादी तरुणांना नोकरी सोडून दहशतवादी बनण्यास भाग पाडत असल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.