Maharashtra

अडीच नाही तर नाही दिड वर्षे मुख्यमंत्रिपद भाजपनं शिवसेनेला द्यावं- रामदास आठवले

By PCB Author

November 11, 2019

मुंबई,दि.११ (पीसीबी) शिवसेनेनं भाजपकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी  लावून धरली होती. मात्र भाजपने मुख्यमंत्रिपद देण्यास शिवसेनेला नकार दिला असल्याने शिवसेना वेगळा मार्ग निवडण्याच्या तयारीत आहे. अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजप-शिवसेनेसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे.

भाजपने साडेतीन वर्षे मुख्यमंत्रिपद तर शिवसेनेनं साडेतीन वर्ष उपमुख्यमंत्रिपद घ्यावं. त्यांनतर शिवसेनेनं दिड वर्षे मुख्यमंत्रीपद घ्यावं आणि भाजपने दिड वर्षे उपमुख्यमंत्रिपद घ्यावं असे आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

भाजप-शिवसेनेनं आपसातील वाद मिटवायला हवा. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी विचारांच्या पक्षांसोबत जाऊन अल्पकाळ टिकणारे सरकार स्थापन करण्यापेक्षा भाजपसोबत यावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.