मुंबई, दि. २४ (पीसीबी) – डॉ. नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश आणि गोविंद पानसरे हत्याप्रकरणात संशयित आरोपींची अटक तसेच नालासोपाऱ्यातून वैभव राऊतला झालेली अटक या प्रकरणात कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचा संबंध असल्याचा आरोप होत आहे. याचा संदर्भ देत सनातनने साधकांना सूचना दिल्या आहेत. निरपराध हिंदूंना अटक होत असल्याने साधकांमध्ये भीती निर्माण होणे स्वाभाविक असून अशी भीती वाटत असल्याने नामजप आणि प्रार्थना करत राहावी, असे सनातनने म्हटले आहे.