अखेर संजय राठोड आज मुंबईत दाखल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारवाई करणार?

0
240

मुंबई, दि.२४ (पीसीबी) : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणामुळे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव सध्या चर्चेत आहे. या प्रकरणावर १५ दिवस गप्प राहिल्यानंतर पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन करत काल राठोड यांनी आपली बदनामी केली जात असल्याचा दावा केला. राज्यात करोनाचं संकट वाढत असताना असताना राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने नाराजी जाहीर केलेली असून संजय राठोड दाखल झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

संजय राठोड आज मुंबईत दरम्यान दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हजर राहणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्याआधी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे या भेटीत नेमकं आता काय होणार याची राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरु आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीतील गर्दीची दखल घेत लगोलग संबंधितांवर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून अहवाल मागवण्याच्या सूचना मुख्य सचिव संजय कुमार यांना दिल्या आहेत.