अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

0
674

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज (गुरूवारी) तिसऱ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. कर्मचारी संघटनेने याबाबत घोषणा केली. सरकारसोबतच्या चर्चेतून  ही कोंडी फुटण्यास यश आले आहे. आजच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संप मागे घेण्याचे आवाहन सरकारने संघटनेला केले होते. सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.