अखेरच्या टी-२० सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय; मालिका १-१ बरोबरीत

0
409

सिडनी, दि. २५ (पीसीबी) – ऑस्ट्रेलियाविरूध्दातील टी-२०  मालिकेतील तिसरा सामना भारताने ६ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.  या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. कृणाल पंड्याची भेदक गोलंदाजी आणि विराट, धवनची आक्रमक खेऴीच्या बळावर भारताने ६ गडी राखत  हा सामना खिशात घातला.