सिडनी, दि. २५ (पीसीबी) – ऑस्ट्रेलियाविरूध्दातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना भारताने ६ गडी राखून जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. कृणाल पंड्याची भेदक गोलंदाजी आणि विराट, धवनची आक्रमक खेऴीच्या बळावर भारताने ६ गडी राखत हा सामना खिशात घातला.