नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांचे सात टप्प्यांमधील मतदान पार पडले असून २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची आज दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट करत बसपा प्रमुख मायावती यांनी आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहेत. तर दुसरीकडे निकालानंतर गरज पडल्यास काँग्रेसला पाठिंबा देऊ असं समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जाहीर केलं आहे.